अजितदादा ‘चोरून’ बोलले, पण धीरूभाई अंबानी खरेच पेट्रोल पंपावर काम करून उद्योगपती झाले!

Dhirubhai Ambani journey: धीरूभाई अंबांनी यांचे नावं ऐकलं, वाचलं किंवा पाहिलं की उभी राहते ती देशासह जगभरात दिमाखानं उभी टाकलेली रिलायन्स इंडस्ट्री. हे धीरूभाई (Dhirubhai Ambani journey)आज पुन्हा चर्चेत आले आहेत. ते मुकेश अंबानी,(Mukesh Ambani) अनिल अंबानी(Anil Ambani) किंवा अंबानी कुटुंबियांमुळे नव्हे तर, राज्याचे उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणा दरम्यान केलेल्या एका वाक्यामुळे. सध्या अजितदादांच्या या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याच निमित्ताने आपण धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर केलेली नोकरी ते देशातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून उदयास आलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. Dhirubhai Ambani journey
“अजितदादा अन् आमच्यात दुरावा नाही पण, त्यांनी आमच्या..” मोहिते पाटलांनी क्लिअरच केलं
अजितदादा नेमकं काय म्हणाले पेट्रोल सोडून की चोरून?
त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले होते. हे जाणून घेऊया. तर, माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार यांनी सभा घेतली. या सभेला संबोधित करताना अजितदादा म्हणाले की, ‘मला सहकार टिकायचे नसते तर, पंप काढले असता का? गोरगरिबांची मुलं तिथं कामाला लागली. मुले पंपावर कामावर लागणं हे माझ्यासाठी कमीपणाचं नाही. कुठलेही काम करणं कमीपणाचं वाटून घेऊ नका. जे पडेल ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्याच्यातून आपण सोनं निर्माण करु’, असे अजित पवार यांनी म्हटले.
पंपावर पेट्रोल चोरून कोर्याधीश झाले आणि तुम्ही?
सिंचन घोटाळा, MSCB घोटाळा करून आपण काय केलत? pic.twitter.com/liXsAxPDAf
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) June 16, 2025
याच दरम्यान दादांनी धीरुभाई अंबानींचा दाखला दिला. पंपावर पेट्रोल सोडूनच धीरुभाई अंबांनी कोट्यधीश झाले, असे उदाहरण त्यांनी दिले. पंपावर पेट्रोल चोरून धीरुभाई अंबांनी कोट्यधीश झाले आणि तुम्ही? अशी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एक्सवर पोस्ट केली आणि ‘स’ चा ‘चं’ झालं आणि इथेच गडबड होऊन वादाला तोंड फुटलं.
रिलायन्स उभी करण्यात धीरूभाईंचा मोलाचा वाटा
आता हे झालं दादांनी दिलेल्या उदाहरणावरून सुरू झालेल्या वादाचं कारण पण, देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय आज अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी तेल आणि वायूपासून ते हरित उर्जेपर्यंत अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, मागे वळून पाहिले तर, आज दिमाखात उभ्या राहिलेल्या रिलायन्सच्या यशामागे धीरूभाई अंबानी यांचे कष्ट आहेत.
गुजरातमध्ये जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे ते फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. पेट्रोल पंपावर काम करण्यापासून ते व्यवसायात प्रवेश करण्यापर्यंत आणि मोठं व्यावसायिक साम्राज्य उभारण्यापर्यंतचा धीरूभाई अंबानींचा प्रवास चित्रपटमय राहिला आहे. धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील शिक्षक होते, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी फळे आणि पकोडे विकण्यास सुरुवात केली.
मात्र, येथे त्यांना फारसे यश न मिळाल्याने ते 1948 मध्ये त्यांचे मोठे भाऊ रमणिकलाल यांच्या मदतीने येमेनमधील अदन शहरात गेले. या शहरात त्यांनी एका पेट्रोल पंपावर महिन्याला 300 रुपये पगारावर काम सुरू केले. या ठिकाणी धीरूभाईंच्या कामावर खूश होऊन कंपनीने त्यांना पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक बनवले. पण ते येमेनमध्ये करत असलेल्या कामावर फारसे खूश नव्हते. त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता. त्यामुळे येमेनमध्ये 6 वर्षे काम केल्यानंतर, ते 1954 मध्ये भारतात परतले.
शिवसेना फुटण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांचाही.. शिंदेंच्या शिलेदाराचा मोठा गौप्यस्पोट
500 रूपयांनी केली व्यवसायाला सुरूवात
येमेनहून जेव्हा धीरूभाई भारतात परत आले त्यानंतर काही दिवस घरी राहिल्यानंतर ते खिशात केवळ 500 रुपये घेऊन स्वप्नांच्या शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत गेले. त्याकाळी 500 रुपयांची खूप किंमत होती. मुंबई गाठल्यानंतर धीरूभाईंनी मुंबईतील प्रत्येक बाजारपेठेत भेट देत पालथी घातली. त्यावेळी त्यांनी देशात पेट्रोलियम आणि परदेशात भारतीय मसाल्यांची मागणी असल्याचे ध्यानात आले आणि त्यांनी या क्षेत्रात सुरुवात केली. मुंबईतील प्रत्येक बाजारपेठेत भेट दिली. आतापर्यंत त्यांना समजले होते की भारतात पॉलिस्टरची आणि परदेशात भारतीय मसाल्यांची मागणी अधिक असल्याचे लक्षात आले आणि येथूनच धीरूभाईंचा व्यावसाय क्षेत्रात श्री गणेशा झाला.
350 चौरस फुटांची खोली अन् 10 तास काम
व्यावसायाची सुरूवात करण्यासाठी धीरूभाईंनी मुंबईत भाड्याने घर घेतले आणि त्यांचे चुलत भाऊ चंपकलाल दिमाणी यांच्या मदतीने रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन या कंपनीची सुरूवात केली. या कंपनीच्या माध्यमातून भारतीय मसाले परदेशात विकले जात तर, परदेशी पॉलिस्टर भारतात विकले जात होते. ज्यावेळी धीरूभाईंनी या कंपनी सुरूवात केली त्यावेळी भाड्याने घेतलेल्या 350 चौरस फूटांच्या खोलीत फक्त एक टेबल, तीन खुर्च्या, आणि एक रायटिंग पॅड होते.
धीरूभाई आणि अन्य कर्मचारी रोज 10 तास काम करत असतं. परंतु धीरूभाई आणि त्यांच्या चुलत भावाचा व्यवसायाच्या पद्धती आणि स्वभावात खूप फरक असल्याने दोघांमधील भागीदारी फार काळ टिकली नसल्याचे सांगितले जाते. त्यानंतर धीरूभाईंनी 1966 मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे एक कापड गिरणी सुरू केली, ज्याचे नाव ‘रिलायन्स टेक्सटाईल्स’ असे होते. हळूहळू त्यांनी प्लास्टिक, मॅग्नम, पेट्रोकेमिकल, वीज निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर धीरूभाईंनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
Dhairyasheel Mohite Patil Exclusive : माढ्यात बदलाचे वारे; रणजीत मोहिते पाटील BJP सोडणार?
1985 साली बदलले कंपनीचे नाव
1985 मध्ये धीरूभाईंनी रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड ऐवजी बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असे ठेवले. धीरूभाईंनी 1991-92 मध्ये गुजरातमध्ये पहिला प्लांट बांधला जो पेट्रोकेमिकल्समध्ये काम करत होता. त्यानंतर धीरूभाईंनी पेट्रोकेमिकल उद्योगात प्रवेश केला. 1998-2000 मध्ये त्यांनी गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारली.